Ek Rajala Char Ranya - Preranadayi Marathi Changla Vichar

Ek Rajala Char Ranya – Preranadayi Marathi Changla Vichar – एका 🤴🏻 राजाला चार 👸🏻 राण्या होत्या

Ek Rajala Char Ranya – Preranadayi Marathi Changla Vichar – एका 🤴🏻 राजाला चार 👸🏻 राण्या होत्या 👈🌺Today we are going to share with you good thought about king, Raja preranadayi changle vichar. If you like this story, Please share on Facebook and Whatsapp. Thanks!

👸🏻 पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?

👸🏻 दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!

👸🏻 तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?

👸🏻 चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!

👉 राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, “मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?”

👸🏻 राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.

👉 राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला

👸🏻 राणी म्हणाली, “मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.

👉 राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, “तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?

👸🏻 तिसरी राणी म्हणाली, “मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.

👉 आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ?

👉 माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?

👉 तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.

👸🏻 ती म्हणाली, “तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.

👉🤴🏻 राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली.

👉 ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.

👉 कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?

👉 त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला?

👉🏿तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.

🔸आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात समाज.

🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा आपल्या मृत्युनंतर आपली
लगेच दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्य-कर्म जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे,आणि विणा अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतचं असते…!

एक चांगला विचार…..करा विचार !
😊😊😊😊😇😊😊😊😊👏🏻


आणखी प्रेरणादायी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇

प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Suvichar in Marathi


कृपया :- आम्हाला आशा आहे की  प्रेरणादायी मराठी सुविचार, inspirational Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…


कृपया, तुम्हाला प्रेरणादायी मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा